कोणीच कोणाचं नसत मराठी स्टेटस | Konich Konach Nast Status In Marathi

1. Konich Konach Nast Status In Marathi

ती आज मला म्हणाली
डोळ्यात तुझ्या पाहिलं ना
की मला आरश्यात पहावसं वाटत नाही.
ह्र्दयात तुझ्या राहते रे मी
आता तर मला घरी रहावसच वाटत नाही.

आज मला खूप रडावसं वाटतंय
स्वतःशी परत खूप भांडावंसं वाटतंय
भरलेल्या डोळ्याने आरश्या समोर
बसावसं वाटतंय
अन आपलं कोणीच नाही म्हणून
स्वतःचेच डोळे पुसावंस वाटतंय.

तुझ्या नंतर ह्या जगातील दुसऱ्या कोणत्या मुलीवर
जर मी जीवापाड प्रेम करेन ना
तर ती आपलीच मुलगी असेल.

जाता जाता ती सांगून गेली
काळजी घेत जा स्वतःची
पण तिचे डोळे सांगत होते की
आता माझी काळजी कोण घेणार

ज्या हक्काने आपण आपला राग व्यक्त करतो
तेवढ्याच हक्काने आपले प्रेम व्यक्त करा
कारण नाते तोडणे सोपे आहे
पण ते पुन्हा जोडणे खूप अवघड आहे.

जवळची नाती ही माणसाला
कधी कधी खूप छळतात
जितके जास्त जपाल तितके
आपणाला आणखी दुर लोटतात.

तुझ्यात आणि माझ्यात 
फरक फक्त इतकाच होता
तुला वेळ घालवायचा होता 
आणि मला आयुष्य.

कितीही जगले कोणासाठी
कोणीच कोणासाठी मरत नाही
अनुभव येत असतात प्रत्येक क्षणाला
पण नशीबाचे चक्र थांबत नाही
आयुष्यात कितीही कराल प्रेम कोणावर
त्याचे मोल सहज कोणाला कळत नाही.

प्रेम इतक त्रासदायक आहे
हे मला माहित असतं तर
हृदय जोडण्याआधी
मी हात जोडले असते.

♥ प्रेम तर तिच्यावर त्या दिवशीच झाल होत
जेव्हा तिने वर्गात मागे वळुन मला विचारल होत
काल का नव्हता आलास रे ♥

मी कुठे म्हणालो की
मला परी मिळावी.
इतकच की
थोडी बरी मिळावी

मला याच अजिबात वाईट वाटत नाही
की तू माझी नाही झालीस
सुख तर या गोष्टीच आहे कि
कधीतरी तू माझी होतीस.

नेहमीच आनंद मिळेल असे नाही
कधी कधी दुःख पण सोसावे लागते
कितीही अहंकारी असाल तरीही
प्रेमात मात्र कधी ना कधी झुकावेच लागते.

मला तुझ पहिलं प्रेम बनायच नाही.
मला तर तुझ शेवट चं प्रेम बनायच आहे.

लोक खरं प्रेम विसरून जातात आणि
मला तिच खोट प्रेम विसरता येत नाहीये.

2. Marathi Konich Konach Nast Status

कोण कोणाचे नसते
हे अगोदर समजले असते,
तर हे तुटणारे नाते,
मी कुणाशी जोडलेच नसते.

तू नेहमी म्हणायचीस
जे होते ते चांगल्यासाठीच होते
मग तुझं मला मला सोडून जाणे
हे तुझ्या चांगल्यासाठी होतं का माझ्या?

किती छान होतं रे आपल नात
कोणास ठाऊक, कोणाची
नजर लागली आपल्या नात्याला
उडून गेली ती स्वप्ने
संपला राजा राणी चा खेळ
मोडली आपली कहाणी अर्ध्यावर
तुजवीण शोन्या राहिले मी अधुरी.

लोक दहा वेळा प्रेमात पडतात
पण मी एकीच्याच प्रेमात 
दहा वेळा पडलो आहे.

मी तुझ्या आयुष्यातून निघून जावं
ही तुझी इच्छा होती आणि
तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात
ही माझी इच्छा होती !

तुझ्या मिठीतील गोडवा
नेहमीच मला भावतो
जसा थंडीच्या दिवसातील गारवा
क्षणार्धात निघुन जातो.

हे मात्र अगदी खरं आहे                 
नवीन नात असत त्यावेळी
लोक बोलण्यासाठी कारण शोधत असतात
पण तेच नातं ज्यावेळी जुनं होतं
त्यावेळी लोक दूर जाण्यासाठी
कारण शोधत असतात.

तेवढं मी कोणाला पाहीलं देखील नाही
पुन्हा कोण ह्या डोळ्यात दिसेल
असं आता वाटतच नाही
जी रहस्याची दारे तुझ्या समोर उघडली
ती दारे कधी कोणासमोर उघडलीचं नाही
पुन्हा ती दारे कधी कुणासमोर उघडतील
असं आता वाटतच नाही
कारण ????? माझं जीवनचं एक रहस्य बनलय
ते फक्त तुलाच उमगलेलं कोडं बनुन राहिलय
ते कोडं आता माझ्यानेही कधी सुटेल
असं आता वाटतच नाही.

जीवनात जोडलेली नाती
कधी तोडायची नसतात
छोट्याश्या वादळानं
विश्वासाची घर मोडायची नसतात.

जेव्हा एखादी व्यक्ती
आतून तुटते ना
तेव्हा ती बाहेरून
शांत रहायला सुरवात करते.

कोणाकडून एवढ्या पण अपेक्षा
करू नये की,
दरवेळेस आपल्याला
आपलाच अपमान झाल्यासारखा वाटेल.

प्रत्येकाच्या life मधे आपण
काही ठराविक वेळेसाठीच
Special असतो.

सोडून जायचे असेल तर
बिंदास जा पण
लक्षात ठेव
मागे वळून बघायची सवय
मला पण नाही.

इतकी वर्षे झाली आता तरी स्वप्नात येऊ नकोस
दूर आपण झालो कधीचे, प्लीज़
आठवणींत भेटू नकोस
झालंय ब्रेकअप तरीही
डोळ्यांना वाट पाहायला लावू नकोस
खरेच सांगू का तुला
माझ्या मनात तू आता राहू नकोस.

प्रेम कधीच चुकीचे नसते,
कदाचित निवड चुकीची असू शकते.

3. Breakup Message in Marathi

तुझ्या आयुष्यात माझी जागा घेणाऱ्या
लाखो तुला भेटतील
पण माझ्या आयुष्यात तुझी जागा घेणारा
फक्त आणि फक्त तूच असशील.

जगात खूप गोष्टी आहेत खेळण्यासाठी
पण तुला माझ्या भावनाच आवडल्या का
खेळण्यासाठी.

नशिबात आणि हृदयात फक्त
एवढाच फरक असतो
जो हृदयात असतो
तो नशिबात नसतो
आणि जो नशिबात असतो
तो हृदयात नसतो.

आयुष्यात एकच गोष्ट
Delete नाही होत
तुझी आठवण…

तुझ्या प्रेमाचा रंग तो
अजूनही बहरत आहे
शेवटच्या क्षणा पर्यंत
मी फक्त तुझीच आहे

पाहशील जिथे जिथे नजर उचलून
मीच असेल उभा ओठांवर स्मित घेऊन
आलेत कधी जर तुझ्या डोळ्यात दुखांचे अश्रू
तुला सुखाचे आनंदाश्रू तिथे तिथे देऊन.

ती आली नसती आयुष्यात तर बरं झालं असतं
उगीचच प्रेमाचा तिरस्कार वाटू लागला

जीवनात प्रेम एकदाच करायचे असते
मन कधी कोणाचे मोडायचे नसते
ज्याने केला भरवसा
त्याच्या भावनांशी कधी खेळायचे नसते.

हसता..हसता…
आयुष्याचा सर्कस आणि
स्वत:चा जोकर कधी झाला
समजलेच नाही…!

माझं हृदय जरी लहान असलं
तरी त्यात तुझ्यासाठी जागा मात्र
मोठी आहे.

नशिबात आणि मनात
फरक फक्त एवढाच आहे
जे नशिबात असतं ते मनात नसतं
आणि जे मनात असतं ते नशिबात नसतं.

रहा तु कुठेही
पण जप मात्र स्वतःला
आडोशाला उभे राहून
पाहीन मी तुझ्या सुखाला.

माझ्यासाठी तोच दिवस खास असेल
जेव्हा मी लाकडावर झोपून
आगीला दुःख संगत असेन.

कधी कधी वाटत की खुप रडावं.
मग लक्षात येते की
माझ्याजवळ माझे अश्रू पुसण्यासाठी
माझं असं कोणीच नाही.

प्रेम करायची एवढी मोठी शिक्षा
नको देऊ रे देवा.
असं रोज रोज मरण्यापेक्षा
एकदाच बोलावून घे.

काही मिनिटांत msg चा reply आला नाही तर
बैचेन होणाऱ्या मनाला
आता दिवसभर न येणाऱ्या reply ची सवय झाली आहे.

4. sad konich konach nast status in marathi

ओठावर तुमच्या
स्मित हास्य असु द्या
जिवनात तुमच्या
वाईट दिवस नसु द्या
जिवनाच्या वाटेवर
अनेक मित्र मिळतील तुम्हाला
परंतु
हदयाच्या एका बाजुस
जागा मात्र माझी असु द्या.

प्रेमाचं सारं कर्ज फेडलंय मी
हिशोब उरलाय तो फक्त
तू दिलेल्या जखमांचा.

इतकी नकोशी झालीय का रे मी तुला
कि एक कॉल हि करावासा वाटत नाही
का मला ?

मी अजूनही त्या फालतूच्या आशेवर आहे कि
एक दिवस तू परत येशील.

असं समजू नकोस कि विसरलो मी तुला
आपल्या प्रेमाला डाग लागू नये
म्हणून दूर आहे मी
मनात फक्त तूच आहेस.

तुमच्या रडण्याने जर गेलेली व्यक्ती
परत येत असती तर
ती व्यक्ती तुम्हाला
एकटे सोडूनच का गेली असती.

आपली सर्वात मोठी चूक
आपण त्या व्यक्तीला सर्वात
जास्त महत्त्व’ देतो
जी व्यक्ती आपल्याला
तिच्या आयुष्यात ‘ऑप्शन’ म्हणून
वापरत असते..

जगणं खूप सुंदर आहे
त्यावर हिरमुसू नका
एक फुल उमललं नाही
म्हणून रोपाला तुडवू नका
सगळं मनासारखं होतं असं नाही
पण मनासारखं झालेलं विसरू नका
सुटतो काही जणांचा हात नकळत
पण धरलेले हात सोडू नका.

एक वेळ अशी होती की
बोलणं संपत नव्हतं.
आणि आता वेळ अशी आहे की
बोलणंच होत नाही.

लोकं फक्त Timepaas साठी
प्रेमाने बोलतात.
आणि आपण त्याला
प्रेम समजून बसतो.

जे आपल्याला Ignore करतात
त्यांच्यासोबत चांगल किंवा
वाईट वागण्यापेक्षा
दूर राहिलेलच बर.

माझ हृदय त्या वाटेवर येउन थांबाव
जिथे माझ्या शिवाय तुझ कुणीच नसाव.

माझ्या दोन इच्छा
जे कधीच पूर्ण होऊ शकत नाहीत
तुला मिळवणं आणि तुला विसरणं.!

ज्यांच्याकडून अपेक्षा ठेवावी
फक्त तेच अपेक्षा भंग करतात
मनापासुन प्रेम करणारेच
फक्त आठवणीत रडतात.

तुला माहिती आहे
माझ्या साठी या जगात
सर्वात महत्वाचे काय आहे ते 
माझ्या वाक्याचा पहीलाच शब्द

उगाच कोणी पण कोणासाठी रडत नसत
अश्रू तेवहाच येतात जेव्हा प्रेम खरं असत.

ह्या हृदयालाच माहिती आहे
माझ्या प्रेमाची स्थिती
कि मला जगण्यासाठी श्वासाची नाही
तुझ्या विश्वासाची जरुरत आहे.

खरे प्रेम आयुष्यात फक्त एकदाच
भेटते त्याचे मोल ते निसटल्यानंतर कळत.

आज सुदधा chat वाचली की खुप
हसायला येत किती
भारी खोट बोलायची तु आणि
मी विश्वास ठेवायचो.

5. Love Mesaage in Marathi Text

माणसाचे आयुष्य जीवनात
दोन वेळा नक्की बदलते
कुणीतरी खास व्यक्तीने
जीवनात प्रवेश केल्यावर
आणि कुणीतरी खास व्यक्ती
नकळत सोडून गेल्यावर.

एकटेपणा तेव्हा वाटत नाही
जेव्हा आपण एकटे असतो
तर तो तेव्हा वाटतो
जेव्हा आपल्याबरोबर सर्वजणं असतात
पण ती व्यक्ती नसते
जी आपल्याला आपल्या बरोबर हवी असते.

तुझ्या येण्याच्या चाहुलीने
अजूनही तिथेच उभा राहतो
जिथे ब्रेकअप करून तुझ्या जाण्याने
अजूनही तिथेच तुझी वाट पाहतो.

कोणाला मिळवणे याला
प्रेम म्हणत नाहीत तर
कोणाच्या तरी मनात आपली
जागा निर्माण करणे म्हणजेच
तर खरे प्रेम

सगळं खोटं असू शकत
पण अर्ध्या रात्री कोणासाठी तरी
आपल्या डोळ्यात आलेले अश्रू
कधीच खोटे नसतात.

एवढा जिव लावून शेवटी
वाईट मीच

आज तुला माझ्या असण्याची किंमत
कळत नाही आहे.
पण एक दिवस असा येईल
तेव्हा तुला माझ्या नसण्याची किंमत
नक्कीच कळेल.

कोणीच कोणाच नसतं
नात हे स्वार्थासाठी जपलेलं असतं
आणि जे नातं स्वार्थासाठी जपलेल असतं
ते एक दिवस नक्की सोडून जात

प्रेमाची खरी किंमत
ते दूर गेल्यावर कळते
कितीही दुर्लक्ष केले तरी
नजर मात्र तिथेच वळते.

सोप नसत
जिवापेक्षा जास्त प्रेम केलेल्या व्यक्तीला विसरण

6. कोणीच कोणाच नसत स्टेट्स मराठी

मीच मुर्ख होतो जे तुला
माझ्या आयुष्यातल्या प्रवासातला
जोड़ीदार समजून बसलो
तू चालत तर माझ्या सोबत होतीस पण
तुझे डोळे दुसऱ्याच कोणाच्या शोधात होते.

प्रेम कोणावर करायचे?
जो आपल्याला आवडतो त्याच्यावर की
ज्याला आपण आवडतो त्याच्यावर
मन वेधून घेणाऱ्या गुलाबावर की
त्याला जपणाऱ्या काट्यावर.

तुझ्यासोबत आयुष्य जगण्याचं
एक स्वप्न होतं
आणि ते स्वप्नच राहिलं…!

मागितली होती फक्त तुझी साथ
तु तर सोडून गेलीस हातातला हात
म्हणूनच आता तुझ्याकडे
माझे काहीच मागणे नाही
पण तुझ्याशिवाय जगणे
म्हणजे काहीच जगणे नाही.

आयुष्य हे One Way सारखं असत
आपण मागे वळून पाहू शकतो
पण मागे जाऊ शकत नाही
म्हणुन आयुष्यातला प्रत्येक क्षण
आनंदाने जगा…

आज मला खुप रडावसं वाटतंय
आरश्यासमोर बसावसं वाटतंय
अन आपलं कोणी नाही म्हणुन
स्वतःचे डोळे पुसावेसे वाटतायेत..

नाती असतात ‘One Time’
आपण निभवतो ‘Some Time’
आठवण काढा ‘Any Time’
आपण आनंदी व्हा ‘All Time’
ही प्रार्थना आहे माझी ‘Life Time´

7. heart touching konich konach nast status in marathi

खुप काळजी घेणारेच
आपल्याला रडवून जातात
कितीही मनापासून प्रेम करा
तुझ्याशिवाय जगु शकत नाही
असे म्हणणारेच एक दिवस
सोडून निघून जातात.

कुणास दुखावू नये उगाच गंमत म्हणून
बरंच काही गमवावे लागते किंमत म्हणून.

जवळीक साधून माझ्याशी
कशी किमया केलीस
वेड लावून माझ्या मनाला
तू का निघून गेलीस.

तू माझ्याशी प्रेम कर अथवा तिरस्कार
दोन्ही माझ्याच पक्षात येईल
जर तू माझ्याशी प्रेम करशील तर
मी तुझ्या हृदयात असेल
अणि जर तू माझ्याशी तिरस्कार करशील तर
मी तुझ्या मनात असेल.

इथे मी स्वत:ला आठवतोय
आणिलोक विचारत आहेत
विसरला का आम्हाला.

माझी Life अशा वळणावर येऊन
थांबली आहे की,
माझ्या जगण्याला काहीच अर्थ नाही
आणि मेलो तरी कोणाला
फरक पडत नाही.

राग तर कधी कधी स्वतःचाच येतो की
समोरच्या व्यक्तीला आपल्या सोबत
बोलायचं नसतं तरी
आपण त्याच्यासोबत बोलायचा प्रयत्न करतो

आयुष्यात एकच चूक केली ती म्हणजे
खोट्या व्यक्तीवर खरं प्रेम केल.

विश्वास ही एक अशी चीज आहे
जी हृदय तुटण्याच्या अगोदर तुटते
आणि नात ही एक अशी गोष्ट आहे
जी स्वार्थ पूर्ण झाल्यावर आपोआप तुटतं.

तुझ्या डोळ्यात अश्रू येतील
असे मी कधीही वागणार नाही कारण
तुझ्या अश्रूची किंमत
मी कधी चुकवू शकणार नाही.

8. WhatsApp Status On Life in Marathi

शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते
तर अश्रुंची गरज भासली नसती
सर्व काही शब्दात सांगता आले असते
तर भावनांना किंमतच उरली नसती.

कधी कधी खूप
दूर पर्यंत जावं लागतं
हे बघण्यासाठी कि
आपलं जवळचं कोण आहे.

माहिती आहे तुझ्या नजरेत मला
काहीच किंमत नाही
पण माझी किंमत त्यांना विचार
ज्यांना मी वळून सुद्धा पाहत नाही.

हा होणारा त्रास कमी कर देवा
तुझी शपथ नंतर कधीच चुकून ही
प्रेमाच नाव सुद्धा नाही घेणार..!

मन गुंतायला हि वेळ लागत नाही आणि
मन तुटायला हि वेळ लागत नाही
वेळ लागतो फक्त
ते गुंतलेले मन आवरायला आणि
तुटलेले मन सावरायला.

इतकेही प्रेम करु नये कि
प्रेम हेच जीवन होईल
कारण प्रेमभंग झाल्यावर
जीवंतपणी मरण येईल.

तुला आज ज्या प्रेमाची किंमत नाही उद्या
त्या प्रेमासाठी नक्कीच रडशील..!

मन गुंतायाला हि वेळ लागत नाही
आणि मन तुटायला हि वेळ लागत नाही
वेळ लागतो फक्त ते गुंतलेले मन आवरायला
आणि तुटलेले मन सावरायला.

9. कोणीच कोणाचं नसतं

कधी कधी काही पाऊले अशी पडतात,
की सावल्या सोबतच्या परख्या होऊ लागतात,
काही गैरसमज इतके मनाला बोचतात,
की आपल्या नकळत
सुंदर नाते हृदयासोबत तोडून जातात.

कधी कोणाच्या डोळ्यामध्ये
पाणी येऊ देऊ नये
हसवता नाही आलं तरी
अश्रूंचं कारण होऊ नये.

पुन्हा भेटशील अश्याच एका वळणावर
तेव्हा असेल तुला माझी आस
कळेल तुला खरं प्रेम होत माझं
नव्हता तो फक्त टाईमपास.

तुझ्या अशा फसवणुकीने
मन घाबरते पुन्हा प्रेम करण्यास
ओळखीच्या माणसाशी देखील
आता तयार नसते बोलण्यास.

तू मला सोडून गेलीस
आता मी कोणालच दोष देऊ शकत नाही
कारण बघ न माझे हृदय पण
सर्वात मोठे धोकेबाज निघाले
ते पण फ़क़्त तुझ्यासाठी धडधडत आहे

जेव्हा काही खास लोक
आपल्याला दुर्लक्षित करत असतील
तेव्हा समजून जा की
त्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण झाल्या आहेत.

नेहमी तुझ्या समोर झुकायची
सवय लागली होती मला.
म्हणूनच कदाचित माझी कदर
नाही समजली तुला.

आयुष्यात हरल्यासारखं
त्या वेळी वाटत ज्या वेळी
आपली आवडती व्यक्ती आपल्याला
परकं असल्याची जाणीव करून देते.

खुप त्रास होतो
जेव्हा ती व्यक्ती आपल्याला
Ignore करते ज्याच्यासाठी आपण
साऱ्या जगाला Ignore केलेलं असतं.

ती जाता जाता मोठ्या गर्वाने म्हणाली
तुझ्यासारखे खूप भेटतील मला
मी पण हसून तिला विचारलं
आता माझ्या सारखाच का पाहिजे तुला.

प्रेम त्याच्यावर करा
ज्याचे ह्रदय आधीच तुटलेले आहे
कारण ह्रदय तुटण्याचे दुःख
त्याच्याइतके कुणालाच माहित नसते.

10. Marathi Status On Life WhatsaApp

एखाद्याला खुप जीव लावुन पण
तो आपल्याला वाईट व्यक्ती समजतो
हे कळाल्यावर खुप दु:ख होत.

एखाद्याला सोडून जातांना
मागे पहावसं वाटलं तर पुढे जाऊ नये
जीवघेण्या माणसांच्या गर्दीत एकटं राहण्यापेक्षा
जीव लावणाऱ्या माणसांच्या मनात भरून रहावं.

जीवनात कोणाला हरवणे
खूप सोपे
मात्र जीवनात कोणासाठी हारुन जाणे
महाकठीण.

ती मला नेहमी म्हणायची की
मी तुला माझं करूनच सोडेन,
आज तिने तेच केलं
तिने मला तीच करूनच सोडलं.

गोष्ट एक स्वप्नातली
स्वप्नातच राहून गेली
डोळे होते माझे मिटलेले..
आणि रात्र तिने चोरून नेली.

कधी कधी लक्षात ठेवण्यापेक्षा
विसरणचं जास्त कठीण असत..

माझ्या या आयुष्याच्या गणितात
दुःखाचा हिशेब अगदी रास्त होता
कारण होरपलेल्या प्रत्येक दुःखी क्षणात
तुझाच वाटा जास्त होता..

जीवन अशा व्यक्ती सोबत जगा
ज्यांना फक्त तुमची एक smile
आणि कायम साथ हवी असते..

मी तुझ्यावर
डोळे झाकून विश्वास ठेवतो
कारण मला माझ्या डोळ्यांवर
विश्वास नाही
पण तुझ्यावर खुप विश्वास आहे.

खरं सांगू का
खरं प्रेम कधीच करू नका
खुप त्रास होतो जेव्हा
ज्याच्यावर आपण खुप प्रेम करतो
ती व्यक्ती आपल्यापासून खुप दूर जाते
मरणानंतर यातना कधीच कळत नसतात
पण प्रेमात कोणी सोडुन गेलं तर,
माणूस जिवंत तर असतो पण
आतून मात्र रोज मरत असतो..
स्वतःला होणारा त्रास
कोणाला सांगू शकत नाही,
आणि त्या व्यक्ती शिवाय
जगू ही शकत नाही.

प्रेमात कधी कधी शांत राहणंच
खुप गरजेचं असतं,
आयुष्याकडे सगळ्याच प्रश्नांची उत्तरे
मागायची नसतात,
कारण ओंजळीत पाणी तर पकडू शकतो
पण ते टिकवू शकत नाही.

नाते कोणतेही असो
ते टिकवण्याचा प्रयत्न तेव्हाच करा
जेव्हा समोरच्याला व्यक्तीला सुद्धा
त्या नात्याची गरज असेल.

दिलेल वचन जर
पूर्ण करता येत नाही तर
वचन कुणाला देत जाऊ नका.
तुमचं तर फक्त वचन तुटत
पण समोरच्याचा विश्वास आणि
मन तुटून जात.

Final Word

जर तुम्हाला konich konach nast status in marathi आवडले असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेयर करा आणि सोशल मीडिया वर सुद्धा नक्की शेयर करा.जर तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला कंमेंट्स मध्ये नक्की कळवा किंवा ई-मेल करून कळवा आम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करू.

Leave a Comment